Tuesday, 20 January 2026

युवा साहित्य संमेलन

ठाणे येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचा समन्व्यक म्हणून मला भाग होता आले. जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या छायेत वाढलेल्या या साहित्यिक वटवृक्षाचे... साहित्य वारीचे पुढचे युवा पाऊल... युवा साहित्य संमेलन.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे आधार स्तंभ सौ.नमिता किर, श्री. प्रदीप ढवळ, युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर, संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रणव सखदेव तसेच साहित्यिक मान्यवर मंडळी यांनी संमेलनाचे नेतृत्व केले.

मराठी साहित्य आणि भाषा यांचे संवर्धन आणि शिक्षण हे पुढच्या पिढीला सुपूर्द करताना त्या भाषेची गोडी, त्यातली रसिकता, त्यातल्या गमती जमती आणि भाषेची आवड जागृत करणे तितकेच जरुरीचे आहे आणि ही गरज ओळखून या संमेलनाचे सर्व नियोजन झाल्याचे जाणवले. नव्या साहित्याचे मुरलेल्या साहित्याशी आणि त्यासोबत नव्या कवीचे जेष्ठ कवी, साहित्यिकांशी नाळ जोडण्याचे कार्य या संमेलनाच्या माध्यमातून झाले. कवितेतून नृत्याविष्कार, म्हणींवर स्टॅण्ड अप कॉमेडी, बालभारतीच्या पुस्तकात वाचलेल्या कविता, बडबडगीते, प्रार्थना नाट्य रूपात सादर करणारे बाल कलाकार. गझल कट्टा, कवी कट्टा, अभिवाचन, कथा कथन अशी साहित्यिक मेजवानी इथे अनुभवली.

संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव यांच्या मुलाखतीत पुस्तकांचे विश्व उलगडत गेले. एक पुस्तक निर्माण होण्यापासून ते पुस्तक ऑनलाईन विक्री पर्यन्त लेखक, प्रकाशक, वितरक असा प्रवास उलगडत गेला. पुस्तकाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळाली. पुस्तकांची दुनियादारी नव्याने अनुभवता आली. बहुभाषिक काव्यकट्टा आणि बोलीभाषा काव्य सादरीकरणातुन आपल्या मराठी साहित्याला जोडणाऱ्या फांद्या ज्या मराठी या वटवृक्षाच्या छायेत फुलत आणि बहरत गेल्या आहेत. त्यांचा आस्वाद घेता आला..

गौरी सामंत यांच्या “ मी ते आम्ही “ या मुलाखतीत तृतीयपंथी समाजाचे प्रश्न समोर आले. दुर्लक्षित झालेले त्यांचे विश्व लेखकांनी आपल्या कथेतून मांडायला सुरवात केली आहे. सामाजिक भान, समाज प्रबोधन आणि मानवता विचार त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने पुढे आला. डिजिटल मीडिया, वेब सिरीज, जाहिरात, माहिती पट यातले भाषेचे योगदान, मराठी साहित्याचा वापर आणि त्यातून करियर संधी या विषयी माहिती मिळाली. साहित्य आणि युवा यांना जोडणारे साहित्य संमेलन, त्याचे बदलेले कलात्मक दर्शन या ठिकाणी झाले. त्यातून मिळालेली ऊर्जा पुढच्या वाटचालीसाठी महत्वपूर्ण असणार आहे.


6 comments:

Unknown said...

👌👌👍

Branding Bhau said...

वाह क्या बात है
छान जुई , नेहमी प्रमाणे उत्तमच लिहलं आहे.

Unknown said...

👌👌👌

EntActoholic (Aditya Sambhus ) said...

मस्तच जुईली

जुईली अतितकर said...

Thank you 🙂

जुईली अतितकर said...

धन्यवाद 🙂

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...